Site icon

Sarva Pitru Amavasya

अमावस्या

 

sarva pitru amavasya

शनिवार, १४ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या असून शास्त्रात याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. शनिवारी अमावस्या तिथी असल्याने ती शनिश्चरी अमावस्या म्हणूनही ओळखली जाईल. याशिवाय, याच दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने केलेले उपाय शुभफळ देतात. या गोष्टी केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो. चला जाणून घेऊया सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावे…
पितृ अमावस्या शनिवारी येत असल्याने यावेळी शनिदेवाचीही विशेष पूजा होईल. या दिवशी शनिदेवाची भक्तीभावाने पूजा करा. शनि अमावस्येला शनिदेव मंदिरात जा. मोहरीच्या तेलाने अभिषेक करा आणि शनि स्तोत्राचे पठण करा. यासोबतच काळे तीळ आणि निळी फुले अर्पण करा. असे केल्याने शनिदोष दूर होतो.
यावेळी शनि अमावस्येला आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांनी वापरलेल्या काळ्या वस्तू गरजू लोकांना दान करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. या वेळी पितृ अमावस्येला काळे चप्पल जोडे, काळे हरभरे, काळे कपडे, काळे तीळ, काळी छत्री आणि मोहरीचे तेल दान केल्यास शुभ फळ प्राप्त होते.या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे, सर्व यंत्र/वाहने, घर  स्वच्छ करून, नारळ ७ वेळा उतारा करुन फेकून देणे.

|| श्री स्वामी समर्थ ||

अमावास्येला करावयाची विशेष सेवा

 

१) सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला (उटण्यासारखे) लाऊन गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी, जमल्यास नदी तीरावर अथवा तिर्थक्षेत्री पंचगव्य संपुर्ण अंगाला लावुन स्नान केल्यास अति उत्तम (पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लाऊ नये).
२) घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी (पांढरी) मोहरी घेऊन ११ वेळा कालभैरवाष्टक व ११ वेळा वेदोक्त “वल्गा सुक्त” म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते.
३) अमावास्येच्या दिवशी घराच्या आजुबाजुच्या सर्व देवी-देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा.
४) अमावास्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा, घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशुळ काढून नारळ उतारा करावा.
५) आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करुन व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू ,गोमूत्र व पंचगव्य टाकून (केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लिनर/फिनेल पण चालेल) घर स्वच्छ पुसून घ्यावे.
६) हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा.
७) आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरुन नारळ उतारा हा सात वेळा “श्री स्वामी समर्थ” मंत्र म्हणून करावा (उतारा करतांना वाहन हे जागेवर चालू ठेवावे) व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासूक्त ११ वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेऊन पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी.
८) घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे.
अमावास्येला आसोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर
१) श्री स्वामी समर्थ १ माळ
२) श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र १ माळ
३) शाबरी मंत्र १ माळ
४) नवनाथ मंत्र ११ वेळा
५) कालभैरवाष्टक ११ वेळा
६) वल्गासूक्त ११ वेळा करावे. गोरक्षचिंच, आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे, जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे…
आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, आसोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा.

★ हिरण्यदान:-
अमावास्येच्या दिवशी १२ ते १२:३० वा. दरम्यान जानवे जोड, सव्वा पावशेर पेढे, ११ रु. दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे. (प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये)

■ घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ-संध्याकाळ त्यावर एका नंतर एकेक असे ७ कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावास्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. (नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा)

★ शक्यतो अमावास्येच्या दिवशी परान्न घेऊ नये

 

 

सर्वपित्री आमावस्या

sarva pitru amavasya

सर्वपित्री आमावस्या निमित्त आपणा सर्वांना एक सहज आणि सोपा उपाय देत आहे.

सर्वपित्री अमावस्या कधी असते?

अमावस्या तिथी – यावर्षी भाद्रपद अमावस्या शुक्रवारी, 13 ऑक्टोबर रोजी रात्री 09.50 वाजता सुरू होणार आहे.

अमावस्या तिथी समाप्ती – शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी रात्री 11.24 वाजता समाप्त होईल.

sarva pitru amavasya

सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांना निरोप

सर्वपित्री अमावस्या तिथीला सकाळी (Morning) स्नान करावे. त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करावा. आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे. तसेच पिंपळाच्या झाडाला पितरांचे निवासस्थान मानले जाते, त्यामुळे या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी देणे महत्त्वाचे असते. तसेच तेथे पितरांना पाणी, तीळ आणि पांढरी फुले अर्पण करावी. तर्पण करताना कुशाचा पवित्र धागा धारण करावा. त्यानंतर पितरांना संतुष्ट करण्यासाठी पांढरे वस्त्र, तांदूळ, फळे, पैसा इत्यादी दान करावे.

असे अनेक लोक असतात ज्यांना त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी मुळे श्राद्ध पक्ष, तर्पण, करता येत नाही. किंवा ज्यांनी श्राद्ध पक्ष, तर्पण केले आहे असे लोक ही हा उपाय आवर्जून करू शकतात.
पितृ लोकाची आद्य देवी म्हणजे स्वधा देवी.स्वधा या शब्दाच्या उच्चारणाने मानवाला तीर्थस्नान करण्याचे फळ प्राप्त होते.मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन वाजपेयी यज्ञाचे फळ पात्र करतो. ‘स्वधाय्ये नमः स्वधाय्ये नमः , स्वधाय्ये नमः ‘ असे तीन वेळा भक्ती पूर्वक स्मरण करून उच्चारण केल्यास श्रद्धा, दान आणि तर्पण यांची फळे माणसाला प्राप्त होतात. श्राद्धाच्या निमित्ताने स्वधा देवीचे स्तोत्र श्रद्धेने ऐकणार्‍या किंवा पठण करणाऱ्या व्यक्तीला शंभर श्राद्धकर्माचे फळ मिळते – यात काही शंका नाही. !!! स्वधा शब्दाच्या उच्चारण मात्रेने आपल्या पितरांची क्षुधा शांत होते.
स्वधा देवी ही पितरांची देवता असून मनुष्य जे काही आपल्या पितरांसाठी दान पुण्य करतो ते सर्व या देवी मार्फत आपल्या पितरांना मिळते. अशा देवीचे श्रद्धेने केलेले नामस्मरण अक्षय पुण्य देणारे. व आपल्या पितरांना शांती प्रदान करणारे आहे.

sarva pitru amavasya

आपल्या घराण्यातील सर्व मृत पूर्वजांचे श्राद्ध, ज्या अमावस्येला केले जाते; तीच ही सर्व पितृमोक्ष अमावस्या. “श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्” । अर्थात, “जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय!.”

या अमावस्येला आपण आपल्या सर्व पितरांचे श्रध्देने श्राध्द करुन एकप्रकारे त्यांना जेवणासाठी आमंत्रित करतो! हिंदू धर्मशास्त्रानुसार “कावळा” या पक्ष्याच्या माध्यमातून आपण आपल्या पितरांना मोठ्या श्रध्देने जेवू घालून, त्यांना तृप्त करीत असतो.!

सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा आणि महत्वाचा दिवस मानल्या जातो, भारतात बहुतांश भागात सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या सुद्धा म्हणतात. जी पितरे पौर्णिमेच्या तिथीला, चतुर्दशीला तसेच अमावस्येला मरण पावले असतील अश्या तिन्ही तिथींचे श्राद्ध सर्वपित्रीला केले जाते. तसेच जर वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पित्रांचे श्राद्ध त्या-त्या तिथींना करण्यास जमत नसेल, तेंव्हा मृतामांच्या शांतीसाठी सगळ्या पित्रांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करतात. तसेच जर आपल्याला पितरांच्या मृत्युची तिथी माहिती नसेल, अशा वेळी देखील आपण त्यांचे श्राद्ध अमावस्येला करू शकतो, आणि म्हणूनच या अमावस्येच्या तिथीला सर्व पितरी मोक्ष अमावस्या असे म्हणतात.

जे आत्मे पौर्णिमेच्या तिथीला अनंतात विलीन होतात अशा पितरांचे श्राद्ध भाद्रपद पौर्णिमेला न करता अमावसेला करतात कारण पितृ पक्षाची सुरुवात सहसा भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून होते. या अमावस्येला सर्वपित्री श्राद्ध केले जाते. या काळात निधन पावलेले पितर म्हणजे वडीलधारी मंडळी तसंच इतर मृत नातलग यमलोकातून आपल्या नातेवाइकांकडे येतात. या काळात ते आपल्या अवती भवती वास्तव्य करून राहातात. त्यामुळेच या काळात पुन्हा श्राद्धविधी केले जातात.

या श्राद्धकर्मांमधून पितरांबद्दल आदर राखला जातो. यामुळे पितरांना सद्गती प्राप्त होते. मोक्ष मिळतो. तसंच ज्यांच्या मृत्यूदिनाविषयी निश्चित माहिती नसते,त्यांचंही श्राद्ध या दिवसांमध्ये केलं जातं..

पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ पितराला पाहूणचार देण्याचा पितृ पंधरवाड्यातील हा शेवटचा दिवस असतो.

या दिवशी सकाळी तयार केल्या जाणार्‍या स्वयंपाकात आपल्या पूर्वजांना जे पदार्थ प्रिय होते ते आवर्जून केले जातात.विधीवत पूजा करून गाय, कुत्रा व कावळा यांचा नैवेद्य केळीच्या पानावर दिला जातो..

या दिवशी पितरांसाठीच्या पंचपक्वान्नांनी सजवलेल्या ताटाचा सुंगध घेऊन गायीला नैवेद्य दिला जातो. अमावस्येच्या संध्याकाळी पितृपक्षाच्या निमित्ताने आलेले पूर्वज आपापल्या वाटेला निघून जातात. त्याप्रमाणे पितर म्हणून आलेल्या व्यक्तीला जेवण, कपडे, रूमाल-टोपी व चपला देऊन अमावस्येच्या सायंकाळीच निरोप दिला पाहिजे.

त्या दिवशी सायंकाळी ताजा स्वयंपाक करुन घराच्या दरवाज्याच्या पहिल्या पायरीवर अगरबत्ती प्रज्वलित करून ‍पूर्वजांचे नाव घेतले पाहिजे. मुलांबाळांना सुखशांती लाभू दे, अशी प्रार्थना करायला हवी..

 

ब्रह्मोवाच –

sarva pitru amavasya

स्वधोच्चारणमात्रेण तीर्थस्नायी भवेन्नरः ।
मुच्यते सर्वपापेभ्यो वाजपेयफलं लभेत् ॥ १ ॥

स्वधा स्वधा स्वधेत्येवं यदि वारत्रयं स्मरेत् ।
श्राद्धस्य फलमाप्नोति कालतर्पणयोस्तथा ॥ २ ॥

श्राद्धकाले स्वधास्तोत्रं यः शृणोति समाहितः ।
लभेच्छ्राद्धशतानाञ्च पुण्यमेव न संशयः ॥ ३ ॥

स्वधा स्वधा स्वधेत्येवं त्रिसन्ध्यं य: पठेन्नर:।

प्रियां विनीतां स लभेत्साध्वीं पुत्रं गुणान्वितम्।।4।।

पितृणां प्राणतुल्या त्वं द्विजजीवनरूपिणी।

श्राद्धाधिष्ठातृदेवी च श्राद्धादीनां फलप्रदा।।5।।

बहिर्गच्छ मन्मनस: पितृणां तुष्टिहेतवे।

सम्प्रीतये द्विजातीनां गृहिणां वृद्धिहेतवे।।6।।

नित्या त्वं नित्यस्वरूपासि गुणरूपासि सुव्रते।

आविर्भावस्तिरोभाव: सृष्टौ च प्रलये तव।।7।।

ऊँ स्वस्तिश्च नम: स्वाहा स्वधा त्वं दक्षिणा तथा।

निरूपिताश्चतुर्वेदे षट् प्रशस्ताश्च कर्मिणाम्।।8।।

पुरासीस्त्वं स्वधागोपी गोलोके राधिकासखी।

धृतोरसि स्वधात्मानं कृतं तेन स्वधा स्मृता।।9।।

इत्येवमुक्त्वा स ब्रह्मा ब्रह्मलोके च संसदि।

तस्थौ च सहसा सद्य: स्वधा साविर्बभूव ह।।10।।

तदा पितृभ्य: प्रददौ तामेव कमलाननाम्।

तां सम्प्राप्य ययुस्ते च पितरश्च प्रहर्षिता:।।11।।

स्वधास्तोत्रमिदं पुण्यं य: श्रृणोति समाहित:।

स स्नात: सर्वतीर्थेषु वेदपाठफलं लभेत्।।12।।

।।इति श्रीब्रह्मवैवर्तमहापुराणे प्रकृतिखण्डे ब्रह्माकृतं स्वधास्तोत्रं सम्पूर्णम्।।
वरील स्तोत्राचे पठण कमीत कमी 11वेळा करावे.
अस्तु!!

 

ग्रहणा विषयी 

sarva pitru amavasya

14-10-23 शनिवारी अमावस्येला सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही म्हणून ग्रहणाचे वेधादी कोणतेही नियम पाळू नयेत
तसेच
28-10-23 शनिवारी कोजागिरी पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे ते भारतात दिसणार आहे म्हणून त्या ग्रहणाचे नियम पाळायचे आहे आहे रात्री 1 तास 18 मिनिटाचे ग्रहण आहे
ती माहिती त्या वेळी सांगितली जाईल

श्री स्वामी समर्थ ..

 

श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Exit mobile version