pitrpaksha

श्राद्ध / पितृपक्षाविषयी शंका समाधान

Pitrupaksha

हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षात पितर आणि पूर्वजांच्या शांती व तृप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. या दिवशी श्राद्ध आणि पिंडदान करण्यास फार महत्त्व आहे. त्याच वेळी धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. जो अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो. म्हणजे पितृ पक्ष किंवा श्राद्ध सुमारे १६ दिवस चालते.पितरांचा मृत्यू कधी झाला याची तारीख पूर्वी फोटोवर टाकली जायची. ते फोटो ग्रामिण भागात आजही भिंतींवर लावलेले असतात. पण, आता फोटो कोणी जपून ठेवत नाही. त्यामुळं त्यावरील तारीखही लोकांच्या लक्षात नसते.

१. घरात / कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का ?

नाही. मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही.

२. घरात / कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?

सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात “अविधवा नवमी” (भाद्रपद कृष्ण नवमी) या दिवशी श्राद्ध करता येते.

३. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात ?

पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात.

४. ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे. ?

शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे.

५. संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे ?

अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात.

६. पितरांची तिथी माहित नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?

भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या ( सर्वपित्री अमावस्या ) या दिवशी सर्व पितरांचे (ज्ञात-अज्ञात)श्राद्ध घालता येते. तसेच ब्राम्हणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान द्यावे.

७. श्राद्ध घालतांना नैवेद्य मंडल कसे घालावे ?

पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे.

८. अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी ?

पितृस्तुती, बाह्यशांती सुक्त, पितरतुष्टीकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी १२ वाजता एका पोळीवर थोडा भात, तूप, ५-७ काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून १ माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते.

मंत्र : मध्व: सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम |
बहिर्ष्मती रातीर्वीश्रिता गिरीषा यांत नासत्योप वाजै: ||

९. मातामह श्राद्ध म्हणजे काय? त्याचा अधिकार कोणाला असतो?:

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध (दौहित्र) असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा (आईचे वडील) जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहीत्राचा अधिकार असतो.

ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी) आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरवात करावी. स्वत:चे वडील गेल्यास दौहित्र करू नये. दौहीत्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो. हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय.

नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही.

१०. पितृपक्षात पारायण करता येते का ?

हो. पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते.(गुरुचरित्र/नवनाथ/भागवत/श्रीपाद चरित्र इत्यादी) पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते.

११. दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते ?

सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील पितर तुष्टीकारक स्तोत्र व बाह्यशांती सुक्त वाचावे. रोज पंचमहायज्ञ करावा (नित्यासेवा ग्रंथात विस्तृत माहिती वाचावी) या पंचमहायज्ञासाठी फक्त ५ मिनिटे लागतात. दर अमावस्येला हिरण्यदान करावे. (१ जाणवे, पेढे, ५ / १० रु. दक्षिणा इत्यादी ब्राम्हणाला दान करावेत) . दर अमावस्येला १ किलो कोळसा व ३ नारळ घेऊन त्यावर १ माळ महामृत्युंजय जप करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून द्यावे.

१. पक्ष भाद्रपद मासातील कृष्णपक्ष

२. पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व
पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा
अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईटशक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते.

श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते.

पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात.

पितृपक्ष (महालय पक्ष)

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला
सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे
हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी
पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते.

श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो, यामागील कारणे या लेखातून जाणून घेऊया.

३. पितृपक्षात श्राद्ध का करावे ?

अ) पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे (रज-तमात्मक लहरींचे) आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज-तमात्मक कोषांशी निगडित असणार्या पितरांना पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणे सोपे जाते; म्हणून हिंदु धर्मात सांगितलेले विधीकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते.

आ). पितृपक्ष हे हिंदु धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून आमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे.

इ). पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात. यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात.

ई). पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना, इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते.

४. पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व

दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ७२ माळा नामजप करावा.

 

Pitrupaksha

तिथी श्राद्धाचे नाव कोणासाठी ?

विधीविशेष

१. चतुर्थी किंवा
पंचमी (भरणी नक्षत्र
असतांना)

भरणी मृत झालेली – व्यक्ती

२. नवमी अविधवा नवमी अहेवपणी मृत
झालेली स्त्री श्राद्ध न करता सवाष्णीला
भोजनही घालतात

३. त्रयोदशी बाळाभोळानी तेरस
(सौराष्ट्रातील नाव)
लहान मुले काकबळी

४. चतुर्दशी घातचतुर्दशी अपघातात मृत्यू पावलेले, शस्त्राने मारले गेलेल,

५. श्राद्ध करण्याची पद्धत

अ. ‘भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास
ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.

हे श्राद्ध पितृत्रयी –
पिता, पितामह (आजोबा), प्रपितामह (पणजोबा);

मातृत्रयी – माता, पितामही, प्रपितामही; सापत्नमाता,
मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह,
मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही,
पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातुल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या
प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत
असतील, ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.

आ. देवांच्या स्थानी (जागी) धूरिलोचन
संज्ञक विश्वेदेव घ्यावे.

इ. शक्य असल्यास देवांकरता दोन, चार पार्वणांना (मातृत्रयी, पितृत्रयी, मातामहत्रयी आणि मातामहीत्रयी) प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोद्दिष्ट गणाला प्रत्येकी एक असे ब्राह्मण बोलवावेत. एवढे शक्य नसेल, तर देवांकरता एक, चार पार्वणांकरता चार आणि सर्व एकोद्दिष्ट गणाला एक, असे सहा ब्राह्मण
सांगावेत.

ई. योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे ‘यावद्वृश्चिकदर्शनम्’ म्हणजे सूर्य वृश्चिक
राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य
तिथीला केले, तरी चालते.’

उ. पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तींसाठी करावयाची श्राद्धे खाली सारणीत दिली आहेत.

टीप:- पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे
फळ मिळते, तेवढे फळ मिळते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावे.

वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते.

त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास साहाय्य होते. हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे.

काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर १२ व्या दिवशीच सपिंडीकरण केले जाते. त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणार्या पितृपक्षामध्येच भरणी श्राद्ध केले, तरी चालते.
(मूळस्थानी)

६. इतरही मघादी श्राद्धे

भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी
महालयात न करता दुसर्या वर्षापासून करावीत.

७. नित्य तर्पण

नित्य तर्पणातही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये.’

८. पक्षपंधरवडा (पितृपक्ष) सर्व कर्मास निषिद्ध का असतो ?

अ. पक्षपंधरवडा कालावधी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो; पण भाद्रपद अमावास्येला (म्हणजेच सर्वपित्री अमावास्या)
महालयाची समाप्ती होत नाही. महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृश्चिकेला गेल्यावरच होते; म्हणून
महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानावा लागेल.

आ. विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध
नसणे

पक्षपंधरवडा (महालय) निषिद्ध किंवा अशुभ
मानण्याची मजल इतकी लांबपर्यंत गेलेली आहे की, या पंधरवड्यात ‘विवाह’ हा शब्दही उच्चारला जात नाही.

मग विवाहविषयक बोलणी करणे, स्थळांना भेटी देणे, विवाह निश्चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर रहातात.

प्राथमिक सिद्धता
इत्यादी कोणत्याही
गोष्टींसाठी पक्षपंधरवडा आड येत नाही.

पक्षपंधरवड्याचा दूरान्वयाने संबंध पिशाचे
इत्यादी पापयोनींशी लावला जातो; पण परिस्थिती अगदी उलट असते. निधन
झालेल्या व्यक्तीची
प्रेतत्वनिवृत्ती वर्षभर होत नसल्यामुळे निधनोत्तर येणार्या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही.

९. भरणी श्राद्ध

अ. पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केल्याने शास्त्राज्ञेचे उल्लंघन होणे

पहिल्या वर्षी अब्दपूर्ती
वर्षश्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेतत्व असते,
पितृत्व नसते. पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो. असे असतांनाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणी श्राद्ध केले जाते,
यात शास्त्राज्ञाचे उल्लंघन होते.

आ. भरणी श्राद्ध करण्याचा काल

पहिल्या वर्षानंतर भरणी श्राद्ध अवश्य करावे. वास्तविक ‘ते प्रतिवर्षी करावे’, अशी शास्त्राज्ञा आहे; पण दुराग्रहाने ते एकदाच करणार्यांनी निदान ते पहिल्या वर्षी
तरी करू नये.

१०. इतरही मघादी श्राद्धे

भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी
महालयात न करता दुसर्या वर्षापासून करावीत.

११. नित्य तर्पण

नित्य तर्पणातही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा.

पहिल्या वर्षी करू नये.’

१. स्वतः करणे महत्त्वाचे

‘श्राद्धविधी स्वतः करायचा असतो. तो
स्वतःला करता येत नाही; म्हणून आपण
ब्राह्मणाकडून करवतो.

आता श्राद्ध करणारे
ब्राह्मणही मिळेनासे झाले आहेत. यावर उपाय म्हणून श्राद्ध-संकल्पविधीच्या पोथ्या मिळतात. त्या
आणून प्रत्येकाने श्राद्ध-संकल्पविधी पाठ करावा.

हा पाठ संस्कृत भाषेत असतो. आपण अन्य भाषा शिकतो, मग संस्कृत तर देवभाषा आहे. तसेच ती
आपल्याला सहज येण्यासारखीही आहे.
(वरील सूत्र तत्त्वतः योग्य असले, तरी संस्कृत भाषेतील उच्चारांतील काठीण्य, शास्त्रात सांगितलेला विधी नीट आकलन होण्याची मर्यादा
इत्यादी पहाता स्वतः श्राद्धविधी यथासांग पार
पाडणे, हे प्रत्येकाला शक्य होईल, असे नाही.
अशांनी ब्राह्मणाकरवी आणि ब्राह्मण न
मिळाल्यास एखाद्या जाणकाराकरवी
श्राद्धविधी करण्यास आडकाठी नाही. श्राद्धविधी होणे, हे अधिक आवश्यक आहे, हे येथे लक्षात घ्यावे.)

२. श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी

मुलाने करणे आवश्यक असणे पूर्वजांची स्पंदने आणि त्यांच्या सर्वांत
जवळच्या वारसदारांची स्पंदने यांमध्ये पुष्कळ
साधर्म्य असते. एखादा सूक्ष्म-देह वेदना अनुभवत असतो, तेव्हा त्या त्रासाची स्पंदने त्याचा सर्वांत जवळचा वारसदारही अनुभवत असतो. याच कारणास्तव श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले
जाणारे विधी मुलाने करायचे असतात.

मुलाची स्पंदने आणि पितरांची स्पंदने एकसारखीच असल्यामुळे श्राद्धतर्पणाच्या वेळी मुलाने दिलेले तर्पण पितरांना ग्रहण करणे सुलभ होते.

३. श्राद्धविधी अमुक एक व्यक्ती करू शकत नाही; म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला ‘संधी न देणारा हिंदु धर्म !’
मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही) समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही) शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे. एकत्र कुटुंबात कर्त्या वडील पुरुषाने (कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांचे पालन पोषणाचे उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीने) श्राद्धे करावीत.विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.’ प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाईल आणि त्याला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदुधर्माने सिद्ध केली आहे.

 

पितृपक्षाबद्दल अधिक माहिती

Pitrupaksha

सामान्यांना एकाच प्रकारचे श्राद्ध माहिती आहे, पण श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत

१. नित्यश्राद्ध : यासाठी दररोज केवळ जलाचा वापर करतात.

२. नैमित्तिक श्राद्ध : सपिंडाच्या अगोदर करतात.

३. काम्यश्राद्ध : आपली जी कामना-इच्छा असेल ती तडीस जाण्यासाठी हे श्राद्ध करतात.

४. नांदी श्राद्ध : षोडष संस्कारादरम्यान करावयाचे एकप्रकारचे वृद्धीश्राद्ध. यालाच कर्मांग श्राद्धदेखील म्हणतात.

५. वृद्धीश्राद्ध : विवाहाच्या मंगलकार्यप्रसंगी करायचे श्राद्ध.

६. यात्रा श्राद्ध : यात्रेस प्रस्थान करण्यापूर्वी घृताचा वापर करून करावयाचे श्राद्ध.

७. सपिंडन श्राद्ध : एखादी व्यक्ती मृत झाल्यापासून १२ व्या दिवशी करावयाचे श्राद्ध. यामुळे व्यक्ती आपल्या पितरांमध्ये संयुक्त होते. हे श्राद्ध झाल्याशिवाय इतर कुठलेच मंगलकार्य, शुभकार्य करता येत नाही.

८. शुद्धीश्राद्ध : प्रायश्चित्त इत्यादीसाठी, मन, शरीरशुद्धीसाठी हे करतात.

९. अष्टकाश्राद्ध : भाद्रपद कृष्ण अष्टमीला हे श्राद्ध करतात.

१०. पुष्टीश्राद्ध : द्रव्य, संपत्ती, ऐश्वर्य, आरोग्य इत्यादींच्या प्राप्तीसाठी पुष्टीश्राद्ध करतात.

-११. पार्वण श्राद्ध : दरवर्षी करावयाच्या’ श्राद्धाला पार्वण श्राद्ध म्हणतात. अमावस्या, चतुर्दशी, अष्टमी व संक्रांती पर्वावर करावयाच्या श्राद्धासही पार्वण श्राद्ध म्हणतात.

१२. गोष्टी श्राद्ध : विद्वान व ब्राह्म समुदाय एकत्र येऊन तीर्थाच्या ठिकाणी पितरतृप्त करून संपत्ती व सुख प्राप्तीसाठी करावयाच्या श्राद्धास गोष्टीश्राद्ध म्हणतात. श्राद्धाविषयी चर्चा करताना अचानक स्वयंस्फूर्तीने जे श्राद्ध केले जाते त्यालाही गोष्टी श्राद्ध म्हणतात.

याव्यतिरिक्त दधी श्राद्ध, हिरण्य श्राद्ध, हस्तश्राद्ध, चट श्राद्ध, आत्म श्राद्ध असे विविध श्राद्ध प्रकार आहेत.

श्राद्धाच्या काही सोप्या पद्धती पण आहेत.

 श्राद्धाच्या सोप्या रिती

१. पाण्याने भरलेला कुंभ-कलश दान करा.

२. अन्नदान करा

३. तीळाचे दान करा

४. गाईस गवत घाला

५. श्राद्ध तिथीस उपोषण-उपवास करा

६. श्राद्ध विधीचे वाचन करा

७. दक्षिणाभिमुख बसून पितरांचे मन:पूर्वक श्रद्धेने स्मरण करा. त्यांच्या आठवणीने डोळे आपोआप ओले होतात. ते होऊ द्या. (नित्यसेवा ग्रंथात दिलेले पितर तुष्टीकारक स्तोत्र वाचावे)

८. निर्मनुष्य जंगलात आकाशाकडे दोन्ही हात उंच फैलावून अंत:करणापासून मी निर्धन व अन्नविरहित आहे, मला पितृऋणातून मुक्त करा, अशी प्रार्थना करा.

जो श्राद्ध करणार असतो त्याला आपल्या मृत पित्याची मृत्यूची तिथी नीट माहिती असावी.

त्याच तिथीला महालय पक्षात (म्हणजेच भाद्रपद कृष्ण पक्ष अमावस्येपर्यंत) श्राद्ध करावे.

Pitrupaksha

हे श्राद्ध नेमके कधी करावे?

उत्तर:- श्राद्ध अपरान्हकाळात करावे. आता प्रश्न पडेल तो हा अपरान्ह काळ काढण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. तो आपल्यालाही काढता येतो. अपरान्ह काळ काढण्यासाठी आपल्या गावच्या सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा माहिती असायला हव्यात. प्रत्येक गावाची ती वेळ वेगळी असल्याने अपरान्ह काळदेखील वेगळा असतो. अपरान्ह काळ काढण्यासाठी दिवसाचे पाच समान भाग करावे लागतील. त्या पाच समान भागांना वेगवेगळी नावे आहेत.

ती अशी.

१. स्थानिक सूर्योदय वेळ

२. प्रात:काळ समाप्त

३. संगव काळ समाप्त

४. माध्यान्ह काळ समाप्त

५. अपरान्ह काळ समाप्त

६. स्थानिक सूर्यास्त वेळ.

ज्याने त्याने आपापली स्थानिक सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ गृहीत धरावी. सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा केली की दिनमान म्हणजेच दिवसाचे एकूण तास येतात. याच दिनमानाचे पाच समान भाग करावेत. त्यानंतर प्रत्येक समान भाग सूर्योदयाच्या वेळेत मिळवित जावा. म्हणजे आपणास क्रमश: प्रात:काळ, संगवकाळ, माध्यान्ह काळ, अपरान्ह काळ व सूर्यास्त या समाप्ती वेळा मिळतील.
त्यातील अपरान्हकाळ महत्त्वाचा.

उदाहरणार्थ:- आपल्या गावचा सूर्योदय सकाळी ६:०० वाजता व सूर्यास्त सायंकाळी ६:३० वाजता असेल तर दिवसाचे तास झाले साडेबारा. त्याचे पाच समान भाग केले तर अडीच तासांचा एक भाग होतो. सूर्योदयाच्या वेळेत पहिले अडीच तास मिळविले की मिळेल प्रात:समय. समाप्तीचा काळ म्हणजे सकाळचे साडेआठ. त्यात पुढे अडीच तास मिळविले की वाजतात ११. हा झाला संगव काळ. त्यात पुढचे अडीच मिळवायचे. वाजला दीड. हा झाला माध्यान्ह काळ. त्यात पुढचे अडीच मिळविले की वाजतात चार म्हणजेच दुपारी दीड ते चार हा झाला त्या गावचा अपरान्ह काळ. ज्यावेळी कावघास टाकणे प्रशस्त मानले जाते.*

कावघास टाकण्यासाठी माध्यान्ह काळ समाप्ती वेळेपासून अपरान्ह काळ समाप्तीपर्यंतचा काळ प्रशस्त असतो.

श्राद्ध म्हटले की लोकांना अनेक प्रश्न पडतात.

एखाद्याचा मृत्यू अधिकमासात झाला असेल तर?

श्राद्ध तिथीला ग्रहण असेल तर?

श्राद्धाचे भोजन करावे की नाही?

जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे.

एखाद्याचा मृत्यू अधिकमासात झालेला असतो. पण तरी त्याचे वर्षश्राद्ध मात्र अधिकमास ज्या महिन्यात असेल
त्या नेहमीच्या महिन्यातच करावे.*

ग्रहण काळात श्राद्ध येत असेल तर ग्रहण वेधाच्या काळात हिरण्य श्राद्ध करावे.

माता-पिता जिवंत असताना इतर ठिकाणी श्राद्धाचे भोजन करावयास जायला कोणतीही हरकत नसते.

श्राद्धवेळी साधू-संन्यासी, योगी पुरुषांना भोजन दिल्यास पितर अधिक संतुष्ट होतात.

अनेकांना श्राद्धाच्या वेळी गोत्र माहीत नसते. मग त्यांनी श्राद्ध करताना ‘कश्यप’ गोत्र उच्चारावे.

अनेकांना पितरांची नावे माहिती नसतात किंवा वयोमानाने आठवत नसतात. मग अशावेळी पुरुष पितरांसाठी देवांची
नावे घ्यावीत व स्त्री पितरांसाठी नद्यांची नावे घ्यावीत.

गरूड पुराणातातील बाराव्या अध्यायात ७० व ७१ क्रमांकाचा एक श्लोक आहे. तो असा

” तस्मात पुत्रेण कर्तव्य षोडशत्रयम भर्तुर्वा कुरूते पत्नी तस्या: श्रेयो ह्यनन्तकम सम्परैतस्य या पत्यु: कुरूते चौर्ध्वदैहिकम क्षयाहं पाक्षिकं श्राद्धं सा सतीत्युचते मया ”

याचा अर्थ असा आहे, जिला संतान नाही तिने पती हयात नसताना स्वत: श्राद्ध केले तरी चालते. वडील हयात
असताना पुत्राची आजोबा-पणजोबा यांच्यासाठी तीर्थश्राद्ध करायची इच्छा असेल तर त्याने त्यासाठी पित्याची परवानगी घ्यावी. पित्याच्या परवानगीशिवाय त्याने ते श्राद्ध करू नये
 श्री स्वामी समर्थ

 

श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *